असं म्हणतात की चांगले बोलर्स चांगले बॅटस् मन घडवतात. हीच analogy साहित्यात आणायची म्हटली तर चांगले वाचकच चांगले लेखक घडवतात. आपण जे लिहितोय ते कोणीतरी जाणकार वाचणार आहे आणि तो जाणकार त्या लिखाणावर चांगल्याप्रकारे व्यक्तही होऊ शकतो हे लेखकाच्या लक्षात आले तर तो अधिक जबाबदारीने लिहितो. पूर्वीच्या काळी वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून असे गाजलेले वाद-प्रतिवाद आपल्याला आठवत असतील. अजूनही प्रगल्भ वाचक ज्या नियतकालिकांना मिळाला आहे ( किंवा त्यांनी मिळवला आहे आणि राखला आहे ) तिथे 'वाचकांचा प्रतिसाद' या सदराला संपादकीय इतकेच महत्व असते. लोकसत्ता आणि अंतर्नाद ही वानगीदाखल उदाहरणे आपण घेऊ शकतो. आपण पुनश्च काढण्याच्या मागचा हेतू भूतकाळातले 'काहीही' वर्तमानकाळातल्या 'कोणालाही' पाठवणे हा नव्हता. समाजातला हरवत चाललेला विवेक, ढासळत चाललेली मुल्यांवरची निष्ठा आणि या सगळ्यापायी येत चाललेलं सांस्कृतिक बकालपण यामुळे अस्वस्थ झालेल्या आमची 'पुनश्च' ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळे लेखक, लेख आणि वाचक हे सगळेच 'निवडलेले' आहेत. आम्ही निवडलेले लेखक आणि लेख, त्याचे विषय तुमच्यासमोर आहेतच. त्यावर 'व्यक्त' होऊन आपण 'निवडलेले' वाचक आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतोय. निमित्त आहे एका अभिनव स्पर्धेचं. लेखक व्यक्त होतो स्वान्तसुखाय म्हणूनच. पण त्याच्या लेखनाला पूर्णत्व येतं जेव्हा एखादा वाचक त्यावर आपली प्रतिक्रिया देतो. साद-पडसाद, ध्वनी-प्रतिध्वनी सारखं. ती प्रतिक्रिया लेखकाचे कौतुक करणारी असेल आणि तो सच्चा भाव त्यात प्रकट झाला असेल तर लेखकाला पुढचे लिहायला उत्साह येतो. ते कौतुक वरवरचं असेल तर लेखकाला त्याने काहीच फरक पडत नाही. आणि ती प्रतिक्रिया जर टीकात्मक असेल आणि केलेली टीका सकार ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीअगदी बरोबर .पटलं बुवा !
Dilip Prabhakar Gadkari
8 वर्षांपूर्वीDilip Prabhakar Gadkari
8 वर्षांपूर्वीShubhada Bodas
8 वर्षांपूर्वीManisha Kale
8 वर्षांपूर्वीPharach Chan Kalpana.