अंक – रत्नदीप, दिवाळी १९५९
उर्दू नाट्यवाङ्मयांत आगा हश्र काश्मीरीला सर्वश्रेष्ठ समजण्यांत येतें. आगा हश्रचे घराणें मूळचें काश्मीरचें. तें पुढे बनारसला येऊन स्थायिक झालें. आगा हश्रचा जन्म बनारसला झाला. नाटकाच्या शौकामुळे तरुण वयांत आगा हश्र हा बनारसहून पळून मुंबईस आला. त्यावेळीं आल्फ्रेड थिएट्रिकल कंपनी मुंबईस गाजत होती. या कंपनीचे मालक कावसजी खटाव आणि व्यवस्थापक अमृतलाल हे होते. आगा कंपनींत अमृतलालना भेटण्यास गेला तेव्हां ते चहा पीत होते. त्यांच्या सांगण्यावरून आगानें 'चहावर ताबडतोब कविता रचून म्हणून दाखविली. त्यावरून खूप होऊन अमृतलालने त्याला कंपनीच्या नोकरींत घेतलें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .