अंक – रत्नदीप, दिवाळी १९५९
उत्तर-प्रदेशांत इंद्रसभेचे प्रयोग होत असतां मुंबई शहरांत उर्दू नाटकांची परंपरा सुरू झाली. मुंबई हे अठरापगड जातीचें शहर. हिंदुस्थानी भाषा साधारणपणे इंग्रज, अँग्लोइंडियन, पारशी, आदि समाजाला समजे. त्यामुळे करमणुकीच्या खेळांत हिंदुस्थानी नाटकाचे प्रयोग केल्यास मुंबईतील मिश्र समाजाला ते आवडतील, अशी कल्पना रूढ झाली. मुंबईतील पहिले उर्दू नाटक डॉ. भाऊ दाजींनी लिहिलें, आणि त्या नाटकाचा पहिला प्रयोग जगन्नाथ शंकरशेटच्या आश्रयाखालीं झाला. ही माहिती कित्येकांना नवीन वाटेल, मुंबईतील उर्दू रंगभूमीचे विद्वान संशोधक डॉक्टर अब्दुल अलीम नामी यांनी मुंबईतील उर्दू नाटके आणि नाटक मंडळ्यासंबंधी फार परिश्रमपूर्वक माहिती गोळा केली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .