असे साहित्यिक आणि अशी आणीबाणी

पुनश्च    कलंदर    2020-06-27 06:00:25   

अंक : रुची,  ऑक्टोबर-नोव्हेंबर – दिवाळी १९७८ लेखाबद्दल थोडेसे : आणीबाणीच्या काळात अनेक साहित्यिक मूग गिळून गप्प होते, ती संपल्यावर आणि इंदिरा गांधींचा पराभव झाल्यावर मात्र, आपण आणीबाणीला कसा  विरोध केला याचे किस्से अनेकजण रंगवून सांगू लागले. त्यातील खरे- खोटे तपासण्याची  कोणतीही सोय नव्हती. त्या स्थितीत साहित्यिकांचे स्वभाव आणि मराठीतील एकेका नियतकालिकांची प्रकृती लक्षात घेऊन करण्यात आलेला हा अतिशय संपन्न, प्रगल्भ  आणि मिश्कील असा  विनोद आहे. जाणत्या वाचकांना त्यातील नेमकी गंमत कळेल. कलंदराच्या तीक्ष्ण विनोदबुद्धीचा हा फर्मास नमुना आहे. कलंदर म्हणजे अशोक जैन हे आता फार जुनं रहस्य झालेलं आहे. हा लेख प्रसिद्ध झाला तेंव्हा मात्र कलंदराचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती होतं. अशोक जैनांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये कानोकानी हे सदर लिहिण्यासाठी घेतलेल्या या टोपणनावाप्रमाणेच त्यांचा स्वभावही कलंदराचाच होता. बरीच वर्षे दिल्लीत राजकीय पत्रकार म्हणून वावरताना त्यांनी दिल्लीतील मराठी संस्कृतीही महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहोचवली. कलदरांच्या पोतडीत त्यामुळेच राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक असे धमाल किस्से भरलेले असत. 'मटा'मधलं त्याचं  सदर अमाप लोकप्रिय झालं होतं. या गोष्टीवेल्हाळ माणसाचं २०१४ साली निधन झालं. रुची मासिकाच्या १९७८ च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** आणीबाणीने देशाला काय दिलं? काहीच दिलं नाही असं म्हणण्याची प्रथा आहे. परंतु हे काही खरं नाही. आणीबाणीने मराठी साहित्य क्षेत्रात स्वातंत्र्यासाठी लढणारे शेकडो धाडसी लेखक दिले. असे धाड ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , रुची

प्रतिक्रिया

  1. sumamata@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    माझे जवळचे स्नेही अशोक जैन यांचा हा लेख पुन्हा वाचताना ओठांत हसू आणि डोळ्यांत आसू होते.ते इतक्यात जायला नको होते .

  2. ppkchemicals@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान कलंदर

  3. vskadam

      5 वर्षांपूर्वी

    हा लेख अशोक जैन यांच्या अशोकवन या पुस्तकात आहे.आणीबाणीची खिल्ली उडवीणारे बरेचसे लिखाण हे आणीबाणी उठल्यानंतरच झाले.

  4. advshrikalantri@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    आणीबाणीत काही पत्रिका नी विरोधी आणि स्वतंत्र भूमिका घेतली होती. त्या लेखकान्चा उल्लेख या लेखात नाही. इन्डियन एक्स्प्रेस समुह आघाडी वर होते. म्हणजे लोकसत्ता ने ही लढाउ भूमिका घेतली असावी.आणीबाणी ला पाठिंबा देणारे ही खूप होते. नारायण आठवले यान्त आघाडी वर होते

  5. sidhayevarsha277@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    अशोक जैन यांच्या इतर लेखांसारखाच हाही खूप मस्त ...टोप्या उडवणारा!👌👌



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts