तीसच्या चळवळीचें सामर्थ्य पाहूनच सरकारने भेदनीतिनुसार स्पृश्यास्पृश्य भेदाला चिरस्थायी स्वरूप देण्याचे ठरविलें, आणि अस्पृश्यांनाही विभक्त मतदारसंघ देऊ केले. पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरादि अस्पृश्य पुढाऱ्यांनीही संयुक्त मतदार संघाची मागणी केली होती. तथापि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळीं राष्ट्रसभेचे एकमेव प्रतिनिधी असलेल्या गांधींनीं विभक्त मतदारसंघाला प्राणपणानें विरोध केला, तर सरकारनियुक्त सभासद आंबेडकरांनी त्याचा आग्रह धरला. परिषदेमध्यें व तिथून परतल्यावर ब्रिटिश मुख्य प्रधान यांना केलेल्या तारेमध्ये गांधींनीं त्याला प्राणपणाने विरोध करण्याचा आपला निर्धार केला होता. अस्पृश्यता हा हिंदुधर्मावरील एक कलंक आहे, असें गांधीजी मानीत होते; अस्पृश्यता राहूनच जर स्वराज्य यावयाचें असेल, तर मला त्याची किंमत नाहीं, असें म्हणत होते,
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
gorakh padar
12 महिन्यांपूर्वीराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या राष्ट्रीय चळवळी अस्पृश्यता निर्मूलन ,स्त्रियांचा सहभाग व त्यांच्या कार्याला विरोध करणारे काही मंडळी या याविषयीचा एक छानसा लेख वाचण्यात आला धन्यवाद