अंक - विश्र्ववाणी, १९३४
‘अकारण मैत्री हेंच आपलं व्यसन दिसतं, आपल्या कक्षेत येणाऱ्या माणसांनीं आपल्याला कल्पतरु म्हटलं तर त्याचं मला आश्चर्य वाटणार नाहीं. लोकाला लागेल ती मदत न मागतां करायची. मला आश्चर्य वाटतं. तें शाँचें नाटक माझ्या नांवाची नुसती चौकशीही न करितां आपण मला दिलंत, लॉजिक येत नाहीं, सांगायचं; पाऊस पड तोय, रेनकोट द्यायचा; जागा नाहीं, आपण उभं रहायचं. लोकांवर उपकारांचं ओझं घालून त्याच्या मोबदल्याची नुसती इच्छाही नाहीं', तो तिच्याकडे पाहून हंसला. त्याच्या पत्नीनें रतनला म्हटलें.
'लोकाला वेड लावायची कला इकडं शिकावी. राग तर कधीं यायचा नाहीं कुणाचाच. परोपकाराची संधी दवडायची नाहीं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .