अंक – गावकरी, ऑक्टोबर १९५७
मुलेंहि स्वावलंबनाच्या या कडक तालमीतच तयार होतात. झाल्या दिवसा पासून खाणेपिणे झाल्यावर मुलाला त्याच्या पलंगांत अथवा गाडींत घालून ठेवतात. ठरल्या वेळी त्याचे कपडे बदलतात. मूल रडतें म्हणून त्याला कोणी हिंडवीत नाही. वेळ असतो कुणाला ? कामाला आई घराबाहेर पडते ती मुलाची गाडी घेऊन. मुलाचें फिरणेंहि होतें व बाजारांत घेतलेलें सामान बाबागाडींत घालून घरी आणणें सोपें जातें. मूल हिंडूं फिरूं लागलें की आपोआपच स्वावलंबी बनूं लागतें. बारीकसारीक कामांत आईला मदत करूं लागतें. नऊदहा वर्षांचीं मुलें तर किती तरी कामे करतात. बाजारहाट, स्वयंपाकाची तयारी करणें, जेवणासाठी टेबल मांडणें, भांडी धुणे, शाळेंत नेण्यासाठी आपले सँडविचेस कापणें हीं कामें लवकरच त्यांच्या आंगवळणीं पडतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .