आजच्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण- बारोमास

पुनश्च    मेधा काळे    2018-03-24 06:16:32   

अंक - महाराष्ट्र साहित्य पत्रिका क्र ३१५ ऑक्टो-नोव्हें-डिसेंबर २००५

‘‘शेतकरी कुटुंबात जन्मलो, मातीत राबलो म्हणूनच मातीतल्या माणसांची सुखदु:खे मांडू शकलो. या काळ्या मातीनेच मला लेखक बनवले व गौरवले. शेतकर्‍यांच्या जीवनाला ‘बारोमास’ वेढून असणार्‍या, जन्मजात वेदनेच्या हुंकारातून जन्माला आलेल्या या कादंबरीचे प्रेरणास्थान माझ्या सभोवतीचा ओलासुका ग्रामीण परिसर हाच आहे. लेखकाने आपल्या निष्ठा आणि अनुभव यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करावे या माझ्यावरील वाङ्मयीन संस्कारांचे फलित म्हणजे ‘बारोमास’ ही कादंबरी आहे.’’ लेखक सदानंद देशमुख यांचे हे विचार ‘बारोमास’ वाचताना अगदी यथार्थ वाटतात. ‘लचांड’, ‘उठावण’, ‘महालूट’ यांसारखे कथासंग्रह व ‘महान’ ही कादंबरी लिहिणारे सदानंद देशमुख, बुलढाणा जिल्ह्यातील, मेहेकर तालुक्यातील, जानेफळ येथील महाविद्यालयात अध्यापक आहेत. मराठीत एम.ए. केल्यानंतर त्यांनी सुमारे 1978च्या सुमारास लेखनाला प्रारंभ केला. धगधगते ग्रामीण जीवन वाचकांसमोर उभे करणारे ते नव्या दमाचे कादंबरीकार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या धोरणामुळे खेड्यांची अवस्था दयनीय झाली होती. स्वातंत्र्य मिळाले. म. गांधींनी मंत्र दिला-खेड्याकडे चला. भारत हा कृषिप्रधान देश असून 80 टक्के खेड्यांचा देश. पण आज स्वातंत्र्य मिळून 55 वर्षे झाली तरी खेड्यांची अवस्था काय आहे? 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुस्तक रसास्वाद , महाराष्ट्र साहित्य पत्रिका २००५ , साहित्य रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. drvyankatesh

      7 वर्षांपूर्वी

    बारोमास बद्दल खूप ऐकलं होत फार पोटतिडिकेन लिहल आहे आवडल

  2. RaviTorne

      7 वर्षांपूर्वी

    dhanyawad punaha ekada sadar pustak vachlyasarkhe vatale.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts