ह्यांची आठवण कुणाला?


लेखक – रविप्रकाश कुलकर्णी भारत-पाक फाळणीच्या झळा ज्यांना सोसायला लागल्या त्यांच्याबाबतीत ही एक कायमची भळभळती जखम होऊन बसली. त्या दुर्दैवी दशावतारांचे वर्णन अनेक लेखकांनी कथा, कादंबरी, काव्य, नाटक अशा माध्यमातून व्यक्त केले आहे. हीच वेदना एका कवीने प्रकट केली – कहते है कि आता है मुसीबत में खुदा याद हम पर तो वो गुजरी कि खुदा भी न रहा याद हा भोग ज्याच्या वाट्याला आला तो कोण होता? तर ज्याने स्वतंत्र पाकिस्तानसाठी केवळ बहात्तर तासाचा अवधी असताना तातडीने राष्ट्रगीत लिहून दिले – ऐ सरजमी ए-पाक जरै तेरे है आज, सितारों से ताबनाक रोशन है कह कहाँ से कही आज तेरी खाक ऐ सरजमी ए-पाक झाला प्रकार असा होता की, १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं. त्यामुळे महंमद अली जीनांपासून सगळयांचीच धावपळ सुरू झाली. ह्या धामधुमीत – केवळ बहात्तर तासाचा अवधी स्वातंत्र्यासाठी राहिला असता लक्षात आलं की राष्ट्रगीताची निवडच अजून केलेली नाही! अर्थात् एकच धावपळ सुरू झाली. शेवटी लाहोर नभोवाणीचे एक तालेवार उच्च अधिकारी एका तरुण २९ वर्षांच्या कवीकडे आले आणि तातडीने पाकिस्तान राष्ट्रगीत हवं अशी त्यांनी मागणी केली. हे सर्व कायदेआझम महमद अली जीनांच्या संमतीनेच आहे हे तो अधिकारी सांगायला विसरला नाही! त्या तरुण कवीला पण लगेच शब्द स्फुरले. हे राष्ट्रगीत १४ ऑगस्ट १९४७ रोजी सर्व ठिकाणी गायलं गेलं. ह्या राष्ट्रगीताचा कर्ता होता – जगन्नाथ प्रसाद! हे होत असतानाच एक नाट्य घडायला लागलं. लाहोर भारतात जाणार की पाकिस्तानात जाणार ह्याचा अंतिम निर्णय होत नव्हता. पण ‘रेडक्लिफ कमिशन’च्या अहवालानुसार लाहोर पाकिस्तानात गेलं. मुस्लिमेतर लोकांची ससेहोलपट ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , व्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Jayram

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती

  2. sanjaypethe

      6 वर्षांपूर्वी

    " जगन्नाथ आजाद " हे खरं नाव आहे. ह्या राष्ट्रगीताबद्दल youtube वर माहिती आहे. https://youtu.be/yTkspZk0K3s



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts