मंत्रिपदाचा ‘शबे आखिर’


अंक : केसरी दिवाळी अंक - ऑक्टोबर १९६२ लेखाबद्दल थोडेसे : नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात( १९४७ ते १९५२ ) मंत्री होते. नेहरूंशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी संधी नाकारण्यात आली. काय होते ते मतभेद? का त्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली? या प्रश्नांची उत्तरं आणि मंत्रिपदाच्या या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या लेखातून मांडले आहेत. १९६२ मध्ये केसरी दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** “साहेब आता मोटार चांगली दिसत नाही.” चंदनसिंग बोलता झाला. त्याने पांच मिनिटांपूर्वीच मंत्रिपदनिदर्शक झेंडा व अशोकचक्र मोटारीपासून काढून घेऊन कॅबिनेट सेक्रेटरीएटकडे धाडले होते. ता. १२ मे १९५२ चा दिवस होता. त्या दिवशी जुने मंत्रिमंडळ समाप्त झाले. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ९ वाजतां व्हावयाचा होता. मंत्रिमंडळांत न घेतल्याने ही सत्तेची कवचकुंडले काढून परत केली होती; आणि या मागे केवढा इतिहास होता! काही नाटककार आनंदपर्यवसायी नाट्यकृतीत चमकतात तर काही शोकांतिकांच्या रचनेत नाट्यकलाकृतीचा उत्कर्ष गाठतात. तसेच थोडे अधिकारग्रहण व त्याग या प्रसंगांतून जातांना अनेक व्यक्तींच्या जीवनात घडून येते. स्थितप्रज्ञ मी नव्हतो. सुखदुःख यांना समान मानले होते असेही नाही. ‘लाभालाभो’ यांना नेहमीच सारखे लेखले असेही नाही; पण खरे सांगावयाचे म्हणजे अधिकारमुक्तीमुळे एक प्रकारची अननुभवलेली शांतता व समाधान लाभले होते. क्षणभर दीर्घ कारागृहवासानंतर मुक्तिदिनी मुक्त झालेल्या मनुष्याला जसे वाटते तसे थोडे वाट ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , राजकारण , केसरी , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. बाबुराव शिंदे

      7 वर्षांपूर्वी

    काकासाहेबांनी लिहलेल्या राजकीय आत्मकथनात बहुदा त्याचे नाव 'लाल किल्ल्याच्या सावलीत',असे असावे.आता नेमके आठवत नाही. ते मी वाचले आहे.त्यात या आठवणी आहेत.त्यांच्याकडे राज्यपालपदाचा प्रस्ताव घेऊन आलेल्या व्यक्तीचेही नाव असावे....काकासाहेब खूप मोठी व्यक्ती.. सीडी,काकासाहेब,नाथ पै,आंबेडकर,मधू लिमये,यशवंतराव ही लोकमान्यांनंतर राष्ट्रीय राजकारणात चमकलेली मोठीच माणसं...!!

  2. mangeshnabar

      7 वर्षांपूर्वी

    ऐतिहासिक माहिती व घटना यांची सजगतेने घेतलेली नोंद या शब्दात या १९६२ च्या लेखकाविषयी म्हणतां येईल. मला हा लेख पुन्हा सविस्तर असा वाटायला हवा. धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts