महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईनगरीत टॅक्सी व रिक्षेत बसताना हिंदी बोलावे लागणाऱ्या, घाऊक खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना गुजराती बोलणाऱ्या, औद्योगिक कामकाजात इंग्रजीचा व्यापार कराव्या लागणाऱ्या मराठी भाषिकाला त्यामागील अर्थकारणाचे रहस्य जाणून घ्यावे लागेल. ताजमहाल हॉटेलच्या ‘रांदेव्हू’ उपाहारगृहात जाऊन मराठी माणूस जेव्हा मराठी भाषेत व्यवहार करेल व तेथील मेन्यूकार्डावर पदार्थांची यादी जेव्हा फ्रेंचच्या बरोबरीने मराठीत (इंग्रजीत नव्हे) छापलेली असेल तेव्हा मराठी भाषा ‘जगायला’ सुरुवात होईल. मुंबई दूरदर्शनवरील सर्व भाषांतील सिनेमांच्या तळ-टीपा (sub-titles) मराठी भाषेत असतील तेव्हा मराठी टिकायला सुरुवात होईल. मुंबई शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी भाषिक वर्तमानपत्रांची, नियतकालिकांची व पुस्तकांची संख्या जेव्हा इतर भाषिक प्रकाशनांपेक्षा जास्त असेल तेव्हा मुंबई दूरदर्शनवरील इतर भाषिक पगडा दूर होईल. => लेखक -: निशिगंध देशपांडे ; वर्ष १९९३ ४ वर्षापुर्वी मुंबईत झालेल्या प्रथम जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून कवी कुसुमाग्रजांनी वर्णिलेली मराठी भाषेची परिस्थिती ‘‘----डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे----’’ आज सुधारली आहे का याचे परीक्षण करू गेल्यास आज काय दृश्य दिसते? भारतात व भारताबाहेर सभा, परिषदा झाल्या, अनेक सरकारी व निमसरकारी समित्या मराठी भाषेचे रक्षण, पोषण, संवर्धन करायला निर्माण झाल्या. साहित्य संमेलनादि सोहळ्यांमधून दु:खदर्शक, प्रसंगी आवेशपूर्ण ठराव झाले. सरकारी अधिकार्यांनी फतवे काढून तुम्हा आम्हाला मराठी भाषिक होण्याचे आवाहन केले, सक्ती करण्याच्या अधू
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
jasipra
6 वर्षांपूर्वीहिंदी सोडून अन्य भाषांची हीच थिती होत आहे
किरण भिडे
8 वर्षांपूर्वीPrchbhopi8
8 वर्षांपूर्वीvarshagokhale
8 वर्षांपूर्वीकिरण भिडे
8 वर्षांपूर्वीShyam
8 वर्षांपूर्वीbookworm
8 वर्षांपूर्वीbookworm
8 वर्षांपूर्वी